Thursday, May 28

नियम, शिक्षा, माणुसकी आणि क्रांती

नियम कश्याकरता असतात ? कुणाकरता असतात ? ते पाळल्याने काय होतं ? आणि न पाळल्यास जी शिक्षेची तरतूद असते ... ती शिक्षा नंतर कोणालाही अमानुष का वाटते? अश्या प्रश्नांमधे मी सध्या पडलो आहे.

अमुक नियम आहेत हे आपल्याला माहित असतं ... आपण ते पाळणार असं कबूल केलेलं असतं .. (म्हणजे काही वेळा आपणच आपल्याला गृहीत धरलेलं असतं.... हे आत्ता गृहीत धरून) म्हणजे असं की '' आपल्याला काय प्रोब्लेम आहे नियम पाळायला'' असा एक आपण आपलाच positive समज करून घेतलेला असतो. आणि एक दिवस आपण तो नियम मोडतो ..

नियम मोडताना आपला नाईलाज असेल तर आपल्या मनात आपण परिणामांचीही तयारी करून ठेवलेली असतेच खरतर .. पण प्रत्यक्ष शिक्षा समोर येउन ठेपली की आपण थेट माणुसकीच्या गप्पा करू लागतो. नियमाप्रमाणे शिक्षा करणारा माणूसच मग उलट न्यायाने आपण अमानुष आणि माणुसकीच्या विरोधात जाणारा ठरवू लागतो.

पण माणुसकीचा खरा अर्थ काय ? माणुसकी म्हणजे माणसाला माणसाने दाखवलेली भूतदया का?

असा जर अर्थ असेल तर ..
  • माणूस स्वतःच्या सोयीसाठी बनवलेल्या गोष्टी मोडतो (नियम .. उदा. लाल सिग्नल तोडणे आणि घाईत पुढे जाणे ... ) तेव्हा इतर माणसांविषयी जरा तरी भूतदया त्याला वाटत असते का?
किंवा ..
  • स्वतःला इतर कोणी भूतदयेने वागवावं अश्या परिस्थितीत माणूस स्वतःला का नेऊन ठेवत असेल?
असे काही प्रश्न पडतात ...

पण जर,

''माणूस''पणा असा जर माणूसकीचा अर्थ धरला तर मात्र काही प्रश्न पडतात ...

  • माणूस नियम का आहेत हे समजून घेत नाही तेव्हा तो माणसासारखा वागत असतो का ?
  • नियम मान्य करणे, आणि आपल्या सोयीचं असेल तेव्हा ते मोडणे हे वर्तन माणसाला शोभतं का ?
  • नियम तोडणारा केवळ शिक्षा होते आहे म्हणून माणूस मानायचा तर ज्यांनी जिवापलिकडे जाऊन कधी नियम आटोकाट पाळले असतील ते काय मूर्ख असतात का ?
  • मग एक युक्तिवाद असतो की जे शहाणे आहेत त्यांनी आणखी शहाण्यासारखं वागावं, शिक्षा वगैरे करू नये .. पण या युक्तिवादातून मूर्खपणाचं समर्थन करण्याचा वेडेपणाच आपण करत नसतो का ?
  • माणसांनी माणसांकरता केलेले नियम पाळणं आणि त्यांचा आदर करणं हे जास्त ''माणुसकी''चं लक्षण नाही का ?
असो ...

नियमांपेक्षा सोयच माणूस जास्त पाहातो.

खरतर नियम करणारा माणूसही सर्वांची सोय होईल किंवा सर्वांचीच सोय नाही झाली तरी कमीतकमी गैरसोयीत सर्वांना कल्याणप्रद अशी परिस्थिति निर्माण होऊ शकेल हा विचार करत असतो .. .. नियम मोडणारा माणूस नियामामागचा हा विचार धुडकावून लावत असतो .. काही वेळा जाचक नियम, रुढी याबाबत ते होतं तेव्हा तिथेच क्रांती सुरु होतेही ....

पण प्रत्येक वेळी हे असं करणं क्रांती वगैरे नसते हे नियम मोडताना लक्षात असावं हे बरं ...

न पेक्षा ही अशी नियम-'उत्क्रांति' ही क्रांतीच्या नावाखाली स्वतःची केलेली ''क्रांतिकारक सोयच'' असते याहून अधिक काय ??

Saturday, May 23

'' घो मला असला हवा ''

कोकणची भुरळ सर्वांनाच पडते. आज मी '' घो मला असला हवा ''  पाहिला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हे (मला वाटतं ..) देवराई सिनेमापासून कोंकण-प्रेमात आहेत. त्यानी या चित्रपटासाठी निवडलेली कथा छान आहे. अगदी कोंकणचीच आहे. पण सिनेमा बघताना सतत एक गोष्ट जाणवत  राहिली. दिग्दर्शक एखाद्या गोष्टीच्या प्रेमात असूनही ती गोष्ट चित्रपटात तशीच्यातशी वठेलच याची काहीही हमी नसते. म्हणजे दिग्दर्शकाला कोकण आवडतय हे ठीक, कलाकारांना ही ते नुसतं आवडून भागणार नाही. कोकण म्हणजे उकडीचे मोदक, मासे आणि वाळूचे किनारे एव्हढीच  मर्यादित व्याख्या माहित असलेल्या कलाकारांना हाताशी घेऊन कोकण तसंच्या तसं उतरवता येणं कठीण आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात जवळ्पास सर्वच कलाकारांचं वागणं, बोलणं या एका पातळीवर खटकत राहातं. त्यामुळे सिनेमाचा परिणाम साधत नाही. माझ्यासारखा कोकण्या तर सारखा हळहळतो. म्हणजे असं की इतके चांगले सीन सुचले आहेत, गाण्यांची सादरीकरणाची इतकी रंजक रचना सुचली आहे, साधली आहे तरीही हा पहिला भाग मात्र आपल्याला कोकणाची भुरळ घालू शकत नाही. सातत्याने आपण बाहेर पडतो .. विचार करतो की का हे कलाकार असे वरवरचं वागता-बोलताहेत. सिनेमाचा दुसरा भाग कथानकाच्या पातळीवर रंजक पण सादरिकरणात गोंधळाचा वाटतोय असो .. 

भावे-सुकथनकर जोडीचा हा सिनेमा नक्कीच कोकणासारखा  exotic आहे.  संगीत, चित्रीकरण, ध्वनिमुद्रण आणि लेखन या सगळ्यात त्याचं प्रतिबिम्ब आहे. म्हणजे .. तश्या वातावरणाचं एक उत्तम चित्र हा सिनेमा करताना  त्या दोघांच्या मनात नक्कीच होतं हे जाणवत राहातं ...

... आणि ...

...  ते प्रत्यक्षात सिनेमात उतरताना गफलत झाली आहे हे ही सतत जाणवत राहातं. 

Wednesday, May 20

पाहुणा पाऊस ...

हा पाऊस ...

पहिल्या पहिल्या थेम्बांचा !

अचानक, आगंतुक ...

दारावर थापही न देता आलेला पाहुणा ...

Monday, May 18

लग्न समारंभ आणि 'आपला हात जगन्नाथ' !!

<< आपले लग्न समारंभ >>

आजकाल आपण मध्यमवर्गीय लोक जे लग्न समारंभ साजरे करतो त्यांच्याबद्दल पुन्हा एक सखोल आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला अतिशय थेट वाटू लागलं आहे.

आपल्या साहेबी अनुकरणाचा भाग असलेली बुफे पद्धत तर आपल्या समारंभांमधल्या जेवणाच्या कोणत्याही रिवाजांना बाद करेल अशीच आहे. मुळात भारतीय खाणं हे बुफे पद्धतीला अनुरूप नाही. डाळ / वरण - भात, सार, एक सुख्खी भाजी, एक रस भाजी, भजी, चटणी- कोशिंबीर, लोणचं, शिवाय पुरी आणि पक्वान्न एव्हढा सगळा बेत असतो .. त्यात आजकाल शेवपुरी, सुरळीच्या वड्या, असे काही पदार्थ वाढले आहेतच ...


'आपला हात जगन्नाथ' या बुफे पद्धतीच्या नियमाला शरण जाऊन अनेक वयोवृद्ध आपापल्या 'ताटांची' वजनं उचलण्याचा महत्प्रयास करण्यातच गुंतलेली दिसतात. एक कडेवर आणि एक हातात अश्या मुलांना सांभाळत दोन दोन ताटे हातात असलेल्या आयांचीही काही वेगळी त्रेधा उडत नाही. त्यात कधी ताटच जमिनीवर पडतं, कधी काहींचं अन्न पडतं, मग त्याच्या साफ-सफाईचे अत्यंत ओन्गळ प्रकार त्या सगळ्या गर्दीतच सुरु होतात. तशी काही टेबल-खुर्च्या मांडलेली असतातही पण ती पकडून बसण्याची अहमहमिकाही असतेच ! पाहुणे असलो तरी ''survival of the fittest'' हा नियम इथेही आपली पाठ न सोडायला चुकत नाही.

बुफे पद्धतीचा अवलंब करताना कार्याच्या यजमानांना आजकाल आपण यजमान आहोत आणि आपल्याकडे काही कार्यानिमित्त जेवायला पाहुणे बोलावले आहेत याचाच विसर पडू लागलेला दिसतो. आपण जेवणाची व्यवस्था (!) लावून दिली आहे या समजात (किंवा गैर-समजात !) एकदा का लग्न लागलं की यजमान इतर पै-पाहुण्यांच्या सरबराईत गुंतत जातात आणि (हल्ली आवर्जून हॉलच्याच एक वेगळ्या भागात केलेल्या खास व्यवस्थेत ! ) जेवायला गेलेल्याना मात्र जो अनुभव येतो तो काही औरच ... !


आपण घरी कोणाला जेवायला बोलावलं आणि ते माणूस आल्यावर आपण टी व्ही पाहात बसलो आणि त्या जेवायला आलेल्याला 'स्वतःचं काय ते वाढून घे नि जेव रे बाबा' असं सांगावं तसा हा सर्व अनुभव असतो. त्यात हॉल छोटा आणि गावभरची माणसं बोलावलेली असा प्रकारही सर्रास असतोच ! त्यामुळे नको हे समारंभाचं जेवण अशी आलेल्या सर्वांची एकंदर मानसिकता निर्माण व्हायलाच आपण प्रोत्साहन देतो आहोत याची कोणालाच काहीच कल्पना नसल्याप्रमाणे सर्व यथास्थित चालूच राहातं.


पंगतीच्या जेवणात सर्व काही आलबेल असतं असं काही नाही. तिथे वैयक्तिक लक्ष, बसून जेवण, सगळे पदार्थ वाढले जाणं असे काही फायदे असले तरी पुढल्या पंगतीत जेवायला उत्सुक मंडळी, आधीच्या पंगतीतल्या जेवत असलेल्या लोकांमागेच उभे राहून त्यांना एका अर्थी 'उठा आता' असा सन्देश देत रसभंग करतातच ...


ह्या सगळ्या प्रकारांनी आपल्या कार्यामधे काहीतरी चुकतय याची वधु-वर, माता-पिता यांना कल्पना असते का ? का कल्पना असली तरी आपण कुठे-कुठे लक्ष घालणार, किंवा एव्हढ्या मोठ्या कार्यात अश्या थोड्याफार गोष्टी होणार .. त्यांना काय महत्व द्यायचं ? अश्या विचारातून ते यात लक्षच घालत नाहीत ?


माहीत नाही ...


पण या सगळ्यामधून मार्ग काढता येतो असं मला वाटतं ... आटोपशीरपणा, खरी आस्था, अगत्य आणि विवाहात बोलावलेल्या लोकांबद्दल खरं प्रेम जर सोबत असेल तर यजमानांनी सोय फक्त आपली स्वतःचीच पाहिली असं होणार नाही ...


आणि .. समारंभामधे खरी शोभाही विराजमान होऊ शकेल .. नाहीतर 'घरचं झालं थोडं ...' अश्याच मनःस्थितीत यजमान मंडळी आणि 'भीक नको पण ...' अश्या काहीश्या मनःस्थितीत पाहुणे अशी लग्नं आता तरी आपण सर्वांनीच थांबवावीत असं मनापासून वाटतंय.

Sunday, May 17

सुखावह शिबिर ... 'पीडीए'चं !

'पीडीए'चं शिबिर पुन्हा सुरु झालं. वर्षातून एकदाच येणारं हे शिबिर सुरु होणे, हा एक विलक्षण आनंदाचा क्षण असतो. या वर्षी शिबिरात २३ जण आहेत. 'पीडीए'चं शिबिर, त्यातली शिस्त, काटेकोरपणा आणि मज्जा यांचं एक भन्नाट मिश्रण हे कोणालाही नंतर कधीच विसरता येत नाही. १८ वर्ष झाली या शिबिराला ... अभ्यासक्रमात यथायोग्य बदल करत, नव्या-नव्या आव्हानांना तोंड देत हे शिबिर दर वर्षी उत्तम प्रकारे चालवलं जातंच आहे...

भालबा केळकर आम्हाला कुणालाच भेटलेलेही नाही. पण त्यांच्या या संस्थेचं हे शिबिर आता आम्ही चालवतो आहोत. शिबिरातून सहभागी कलाकारांच्या जाणिवा समृद्ध होणं हे तरी नक्की होत आलं आहे.

'पीडीए'ला या शिबिरातूनच नवे कलाकार मिळतात आणि म्हणूनच आज 'पीडीए' पुन्हा जोमाने कामाला लागली आहे.

सहस्रचन्द्रदर्शन हे स्वतंत्र दोन अंकी नाटक आणि अचलायतन हे रविन्द्रनाथांचं नाटक यांची निर्मिती आणि यश हे दोन्हीही या नव्या कलाकारांनीच साध्य केलं आहे.
भालबा, डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापना केलेलं हे स्वप्न किंवा तत्सम काहीतरी आज आम्हाला त्यात सामावून घेतं आहे आणि त्यातच अनेकांची स्वप्न साकार होताहेत, येऊन मिळताहेत हे नक्कीच सुखावह आहे !

Saturday, May 16

आजकालचं लाइफ !

आजकालचं लाइफ !
 
हसायचे
हसायचे ...
जिथे-तिथे
हसायचे !
देखणे दिसायचे !
 
मनातल्या
मनातुनि
छुपे-छुपे
रडायचे !
देखणे दिसायचे !
 
म्हणायला
म्हणायचे
बरे - बरे
म्हणायचे !
देखणे दिसायचे !
 
जगायचे
तगायचे
कसे बसे
जगायचे !
देखणे दिसायचे !

Wednesday, May 13

स्वप्नांशी जोडलेलं नातं

माझे आई-वडिल नोकरी करण्याकरता मुंबईमधे आले. त्यांनी या काळात स्वतःची उत्तम प्रगति साधली आणि रिटायर झाल्यावर ते पुन्हा कोकणात गेले. या दरम्यानच्या काळात त्यानी रहाण्याच्या अनेक जागा बदलल्या. माझे वडिल प्रथम शिवाजी मंदिर च्या फ़ुटपाथ लगतच्या ताम्बे गादिवाल्यांच्या दुकानाबाहेर रात्र काढत असत .. मग ते माटुंगा रोडच्या त्यांच्या नातेवाईकांकडे  राहू लागले. मग लग्न झाल्यावर जोगेश्वरीला जागा घेतली. त्यानंतर पार्ले ! आणि मग रिटायर झाल्यावर संगमेश्वर ... 

या दरम्यान स्थावर मालमत्ता या सदरात कितीतरी प्रकार त्या दोघांनी केले .. म्हणजे स्वतःच घर घेणे, पगड़ी सिस्टम मधली छोटी किंवा नंतर मोठी जागा घेणे .. एखादा प्लॉट घेणे, त्याची देखरेख करणे, टैक्स भरणे .. असं बरंच काही ...

मी आता विचार करतो तेव्हा मला वाटतं की किती कुठल्या कुठल्या जागा, प्लॉट्स, हा  सगळा  व्याप त्यानी सांभाळला  तेव्हा ती दोघंही खूप साधी माणसं होती. त्यांनी त्या त्या जागांबाबत कितीतरी स्वप्नं पहिली होती .. ती पाहताना आम्हा दोघाही मुलाना त्यांची ती स्वप्नं नि पर्यायाने त्यावर बेतलेली आमचीही स्वप्नं दिसली होती .. हळूहळू त्यांच्या प्राथमिकता बदलल्या आणि त्यांनी त्यातल्या काही जागा कायमच्या सोडल्या .. विकल्या किंवा तत्सम काही व्यवहार करुन ते सर्व बदलून गेलं. 

त्या जागा, ती स्वप्नं सर्वच ... गेलं ..

गेलं? कुठे गेलं ? कसं गेलं ?

माणूस ज्या गोष्टीची स्वप्नं पाहतो त्या गोष्टीशी ती स्वप्नं पाहताना त्याने जोडलेलं ते नातं कुठे जातं ?

Monday, May 11

पावसाचा ऑर्केस्ट्रा !

या ऊष्ण उन्हाच्या झळा करपवताहेत आणि माझ्या मनात आठवण येते आहे माझ्या लहानपणीच्या घराची ...
मी पहिली-दुसरीत असेन ... आणि घरसुद्धा एकाच खोलीचं होतं ... पत्र्याच्या भिंती आणि कौलांचं छप्पर ...
जून महिन्यात गावाहून परत आल्यावर पहिला पाऊस यायचा तेव्हांची आठवण !

कौलांचं छप्पर कितीही साफ केलेलं असलं तरीही पाऊस त्यातून वाट शोधत घरात शिरायचाच !

मग धुणं वाळत घालायची काठी घेऊन जिथून गळतंय ती एक-दोन कौलं जरा जरा हलकेच ढोसायची म्हणजे गळायचं थांबत असे ... पण मी जर कधी एकटाच घरी असलो आणि पाऊस असा घुसखोरी करू लागला तर मी मात्र एक गम्मत करत असे

काठीने कौलं ढोसायची कल्पना मला पसंत नव्हती ... मी वेगवेगळी भांडी त्या गळ त्या धारांखाली ठेवून ही गम्मत करत असे

वेगवेगळी भांडी आणि गळणारे पाणी यांच्यातून ध्वनिंची एक मालिका तयार होत जायची ... आणि हा ऑर्केस्ट्रा मी पाऊस पडत राहील तोपर्यंत एन्जॉय करत राहायचो ... पाणी भरलं की आवाज कमी होत असे म्हणून मी एक बादली आणून त्यात जमा होणारे पाणी पटापट रिकामे करत असे ... म्हणजे पुन्हा ते भांडे आवाज करायला लागत असे ... प्लास्टिक, स्टील, एल्यूमिनियम अशी विविध भांडी वापरली की वेगवेगळी नोटेशंस तयार होत असत ...

खुपच मजा येत असे ...

पत्र्याचं घर गेलं ... आणि ती मजा ही गेली !

Sunday, May 10

मराठीत ब्लॉग

मराठीत ब्लॉग लिहिण्याची ही सुरूवात आहे ...
इतके दिवस ट्रांस्लिटरेशन माझ्याही ब्लॉगवर होतय याची मी दखलच घेत नव्हतो ...
आता मराठीत अधिक चांगला लिहिन ....

Riyaaz, Singing ... I miss you!

My mind is being pulled for last several months towards my passion for Music or singing to be precise. Recently I have started looking for possibilities of 'beginning to learn' to sing again!

I began my lessons in Music (Indian/Hindustaani Classical Singing)at the age of 6 at a place in Vile Parle, Mumbai. It was a music class run by Mrs Vyas. Mrs Vyas was a very nice lady and used to train me in her style which was more for those who wanted to appear for the Gandharva Mahaviddyalay exams. As I grew up. I found that I was not liking the exam oriented/bound approach. I shifted to another music class named Uday Sangeet Viddyalay run by one very old Mr Desai. Desaiguruji was much advanced and would train me about many more things that I found advanced and challenging at that age. But I had this strange fobia of his house. It was not well-kept. I used to leave my home in all spirit and energy for the music class and would not dare climb the satirs to his flat and may be come back or go to one of my freind who played table and we would sit together and I would sing for hours. My mother felt I was in the class studying music ... :) .. This happened for years .. may be 5-6 of them and there was this change in my voice that was about to strike me .. My school music teacher Mrs Varsha Ambekar, who is entirely to be thanked for all that is inside me for music, told me that I should be going to someone who can help me retain my voice qualities through this inevitable years of change .. and I met another gentleman Pt Ramkrishna Patwardhan.

I was in 8th standard, and went to his music class with a notion in mind that I am going to learn something more adavnced .. and what happened was so different! I was told to sing only three notes Sa -- Pa and Saa ... and back and so on .. for months I was left doing only this. Strangely enough, however, I did not develop any kind of phobia or dislike for all that .. I kept doing what he told me .. and here I am .. even after not persuing music for years .. my voice is still in a good condition.

I am so grateful to Mrs Ambekar and Pt Patwardhan for building the basic strength in me. Mrs Ambekar gave me vision and corrected my apptitude for arts in general and Pt Patwardhan gave me strength.

Later I had an opportunity to learn a few things from Pt Ajay Pohankar and Ustad Sayeeduddin Dagar ..

And ..

Now, I am looking forward to my studies in Music .. singing ... I am looking forward to be a good singer, like I was in my childhood.

Sunday, May 3

Being A Last Customer in a Pune Restaurant !

This is an inevitability of my life. Being active in theatre, my usual times to have meals at night are somewhere around 11. Rehearsals, shows usually are in the evenings and I am set free for such essential activities, only after 10.30. and this is the most early estimation.

Well, most of the times both of us are involved in the play or show or rehearsals. Obviously we have to resort to some hotel serving food at that time for our dinner. All this makes us the most susceptible species for this syndrome called ''Being the Last customer in a Pune Restaurant''.

First of all let me clear yet another mis-concept. We are the causative organism. That way we are susceptible .. not in the way of being affected by it. We induce the signs and symptoms of this syndrome in the restaurant staff that is 'susceptible' in the real sense.

Being the last customer in a Pune restaurant .. this 'Pune' restaurant is another specification. As this syndrome is 'endemic' in nature.

The food cycle begins with Pune restaurant owners and ends at me. The stores manager, cashier, managers in the restaurant, cooks, captains, the waiters and the cleaning staff are the essential components of the chain. The syndrome's occurrence is largely seen in the population at the lower end of the chain. It begins from the cleaning staff upwards and it secondarily affects me.

Signs and Symptoms :
1) Induces Frowning in Waiters.
2) Induces hurried or hyperactive behaviour in the cleaning staff.
3) Induces Hyper-traits of either polarity of behavior like .. extra courtesy in some managers.
4) A few waiters try to avoid you in a near-paranoiac behaviour pattern.
5) A sudden increase in negativity in the captains.
6) Higher managers star becoming extra-alert. (They start wiping their napes and foreheads often and look at the road in anxiety .. for Police Van on patrol)
7) Me and eater are subjected to most inconveniences like almost zero lights, no fans, a terrible noise of unoccupied chairs and tables (as the hyper active cleaning staff starts putting them to their specified positions)
8) The eater may loose chappals (if they have a habit of removing them frequently)as the cleaning staff starts washing the floor while you are still there.
9) Induced Starvation - Because of Limited choices of menu or non-availability of cooking staff or non-availability of captains or waiters or serving staff who are busy eating themselves.
10) The cashiers and managers are in an easy irritability syndrome. They want you to eat faster and pay up fast !
11) The only waiter who is left to attend you faces bouts of anxiety, irritation, rudeness and restlessness. This makes him either walk too and fro from time to time looking at the bill and making sure it is still not paid or waiting or standing still at a place being totally focused on your hand moving in the direction of your wallet. Some such waiters are forced to stand exactly BEHIND you, literally 'waiting' for you to pay up and finish off.

This strange syndrome, I think is a result of hotel owners who do not realise that they are actually running a 'service' industry. The equation of service orientation goes haywire after a certain time in the minds of the serving staff. The hotel managers and owners do not realise the threshold of their staff. They keep on accepting customers to the nth minute and then this syndrome precipitates.

I must also acknowledge here, a few places in Pune, who have realised their limits of being 'hospitable' and therefore who close down or avoid more customers after a certain time. A few others, also show a certain unbeatable service orientation till the last moment .. i.e. till you actually leave their premises at whatever time ...